शिंगोलीत जनता दरबार; नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना
जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांशी रणाजगजितसिंह पाटील यांचा थेट संवाद; अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश
शिंगोली : शिंगोली येथील निवासस्थानी आयोजित जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांशी लोकप्रतिनिधी रणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी व प्रश्न जाणून घेतले. नागरिकांनी आपल्या समस्या, अपेक्षा तसेच विविध विषयांशी संबंधित मागण्या यावेळी मांडल्या.
जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित विषयांची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ ऐकून न राहता त्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांशी थेट संवाद हा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक प्रश्नामागे एका कुटुंबाची चिंता, अपेक्षा किंवा भागाच्या विकासाशी संबंधित गरज असते, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. जनतेचा विश्वास आणि त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत उभे राहण्याची जबाबदारी हीच कामाची खरी प्रेरणा असल्याचेही सांगण्यात आले.