पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; राज्याच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना
पंढरपूर | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पावन वातावरणात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांच्या समवेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा पवित्र योग लाभला.
यावेळी विठुरायाच्या चरणी महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. राज्यात शांतता, विकास आणि सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी करण्यात आली.